- Hindi News
- जळगाव
- साहित्यिक मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’चे रविवारी " पुस्तक प्रकाशन"
साहित्यिक मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’चे रविवारी " पुस्तक प्रकाशन"
संत तुकाराम महाराजांच्या निवडक अभंगांचे निरूपणपर स्पष्टीकरण; साहित्यिका अस्मिता मेश्राम यांच्या हस्ते प्रकाशन.
जळगाव प्रतिनिधी
जळगाव: येथील साहित्यिक मिथुन ढिवरे यांचे ६ वे पुस्तक "जनमाणसांतील तुकोबा भाग दोन" येत्या रविवारी प्रकाशित होत आहे. मिथुन ढिवरे यांचे "जनमाणसांतील तुकोबा भाग एक" पुस्तक गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रकाशित झाले होते. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांचे निरूपणपर स्पष्टीकरण या पुस्तकात करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे प्रकाशन साहित्यिका अस्मिता मेश्राम "पुष्पांजली" भंडारा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे ह भ प दीपक महाराज पाटील शेळगावकर तसेच अथर्व पब्लिकेशन्स चे प्रकाशक युवराज माळी आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धांडे फाउंडेशनचे संचालक नेमीवंत धांडे सर असणार आहे. कार्यक्रम येत्या रविवार रोजी दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ०५ ते ०६ या वेळेत ऑर्बिट क्लासेस, गिरणा टाकी रोड, पोस्टल कॉलनी च्या मागे, लक्ष्मी नगर येथे होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा व शहरातील वाचक तसेच पुस्तक प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन साहित्यिक व पुस्तकाचे लेखक मिथुन ढिवरे यांच्याकडून करण्यात आलेले आहे. कार्यक्रम संपल्यानंतर एक पुस्तक तसेच चहा व नाश्ता देण्यात येणार आहे.
साहित्यिक मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’चे रविवारी " पुस्तक प्रकाशन"
संत तुकाराम महाराजांच्या निवडक अभंगांचे निरूपणपर स्पष्टीकरण; साहित्यिका अस्मिता मेश्राम यांच्या हस्ते प्रकाशन.
जळगाव प्रतिनिधी
जळगाव: येथील साहित्यिक मिथुन ढिवरे यांचे ६ वे पुस्तक "जनमाणसांतील तुकोबा भाग दोन" येत्या रविवारी प्रकाशित होत आहे. मिथुन ढिवरे यांचे "जनमाणसांतील तुकोबा भाग एक" पुस्तक गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रकाशित झाले होते. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांचे निरूपणपर स्पष्टीकरण या पुस्तकात करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे प्रकाशन साहित्यिका अस्मिता मेश्राम "पुष्पांजली" भंडारा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे ह भ प दीपक महाराज पाटील शेळगावकर तसेच अथर्व पब्लिकेशन्स चे प्रकाशक युवराज माळी आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धांडे फाउंडेशनचे संचालक नेमीवंत धांडे सर असणार आहे. कार्यक्रम येत्या रविवार रोजी दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ०५ ते ०६ या वेळेत ऑर्बिट क्लासेस, गिरणा टाकी रोड, पोस्टल कॉलनी च्या मागे, लक्ष्मी नगर येथे होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा व शहरातील वाचक तसेच पुस्तक प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन साहित्यिक व पुस्तकाचे लेखक मिथुन ढिवरे यांच्याकडून करण्यात आलेले आहे. कार्यक्रम संपल्यानंतर एक पुस्तक तसेच चहा व नाश्ता देण्यात येणार आहे.