- Hindi News
- मुंबई
- महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य..
महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य..
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा बॅज तीन महिन्यांसाठी रद्द होणार
मुंबई प्रतिनिधी -
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या नियमाची आजपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
नियमाचं पालन न करणाऱ्या चालकांना प्रथम नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी रद्द केला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
नवीन बॅज देताना आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे चालकांच्या मराठी भाषेची चाचणी घेणार असून, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे.
तसंच, बनावट अधिवास प्रमाणपत्रांच्या प्रकरणांची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेची जबाबदारी अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य..
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा बॅज तीन महिन्यांसाठी रद्द होणार
मुंबई प्रतिनिधी -
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या नियमाची आजपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
नियमाचं पालन न करणाऱ्या चालकांना प्रथम नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी रद्द केला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
नवीन बॅज देताना आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे चालकांच्या मराठी भाषेची चाचणी घेणार असून, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे.
तसंच, बनावट अधिवास प्रमाणपत्रांच्या प्रकरणांची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेची जबाबदारी अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.