पनवेल, माणगावात मनसे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवर राज ठाकरे यांची टीका..

sandeep patil Picture
On

रायगड -

 रायगड जिल्ह्यातील १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रायगड दौरा केला. यावेळी त्यांच्या हस्ते पनवेल आणि माणगाव येथील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.

 

 

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज ठाकरे यांनी स्थानिक नेते आणि राजकीय हस्तक्षेपावर टीका केली. राजकीय हस्तक्षेपामुळे महामार्गाचे काम रखडल्याचा आरोप त्यांनी केला. महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण यापूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. कंत्राटदार कामातून माघार घेत असल्याचे गडकरी यांनी सांगितल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.

 

 

महामार्गाच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन वेळेत न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. कंत्राटे आणि त्यातील कथित टक्केवारीच्या राजकारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. नव्याने बांधलेल्या रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

 

 

रायगडमध्ये सुरू असलेल्या विकासकामांवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकास आराखड्याचाही उल्लेख केला. या भागात एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, डेटा सेंटर, जागतिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे उभारण्याच्या योजना असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या विकास प्रक्रियेत स्थानिक तरुणांना संधी मिळणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

 

विकासाला आपला विरोध नसून कोकणातील विकास नियोजनबद्ध आणि स्थानिकांच्या हिताचा असावा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. स्थानिक नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींकडून विकासकामांबाबत जाब विचारावा आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींना मतपेटीतून धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

Edited By: sandeep patil
www.maharashtrasarthi.com
10 Aug 2026 By sandeep patil

पनवेल, माणगावात मनसे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवर राज ठाकरे यांची टीका..

रायगड -

 रायगड जिल्ह्यातील १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रायगड दौरा केला. यावेळी त्यांच्या हस्ते पनवेल आणि माणगाव येथील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.

 

 

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज ठाकरे यांनी स्थानिक नेते आणि राजकीय हस्तक्षेपावर टीका केली. राजकीय हस्तक्षेपामुळे महामार्गाचे काम रखडल्याचा आरोप त्यांनी केला. महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण यापूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. कंत्राटदार कामातून माघार घेत असल्याचे गडकरी यांनी सांगितल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.

 

 

महामार्गाच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन वेळेत न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. कंत्राटे आणि त्यातील कथित टक्केवारीच्या राजकारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. नव्याने बांधलेल्या रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

 

 

रायगडमध्ये सुरू असलेल्या विकासकामांवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकास आराखड्याचाही उल्लेख केला. या भागात एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, डेटा सेंटर, जागतिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे उभारण्याच्या योजना असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या विकास प्रक्रियेत स्थानिक तरुणांना संधी मिळणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

 

विकासाला आपला विरोध नसून कोकणातील विकास नियोजनबद्ध आणि स्थानिकांच्या हिताचा असावा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. स्थानिक नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींकडून विकासकामांबाबत जाब विचारावा आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींना मतपेटीतून धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

https://www.maharashtrasarthi.com/state/raj-thackeray-criticizes-the-state-of-mumbai-goa-highway-at-the/article-132

खबरें और भी हैं

श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..

ताजा बातम्या

श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..

पुणे -   श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यात येत्या १३ ऑगस्टपासून भीमाशंकर मंदिर सकाळी...
राज्य 
श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..

'डीआरआय’ ने महाराष्ट्रात आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट केले उद्ध्वस्त..

मुंबई प्रतिनिधी - मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली सातत्यपूर्ण कारवाई सुरू ठेवत, महसूल गुप्तचर...
राष्ट्रीय 
'डीआरआय’ ने महाराष्ट्रात आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट केले उद्ध्वस्त..

माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी....

रायगड प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पावसाळी वातावरण आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची...
राज्य 
माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी....

रेल्वे पोलिसांना बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिहार राज्यातील तरुणाला माणुसकी वृद्ध आश्रमाने दिला सहारा.

   रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशन, संभाजीनगर येथे दि. ०६/०५/२०२६ रोजी एक इसम बेवारस अवस्थेत रेल्वे प्लॅटफॉर्मवर आर.पी.एफ. पोलीस अधिकारी राकेश शर्मा...
जळगाव 
रेल्वे पोलिसांना बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिहार राज्यातील तरुणाला माणुसकी वृद्ध आश्रमाने दिला सहारा.