- Hindi News
- क्रीडा
- सिनियर सिटीझन संडे मॉर्निंग वॉक ग्रुपमध्ये प्रा.डॉ.रामकृष्णा पाटील यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन.
सिनियर सिटीझन संडे मॉर्निंग वॉक ग्रुपमध्ये प्रा.डॉ.रामकृष्णा पाटील यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन.
जामनेर - प्रतिनिधी
येथील संत साहित्याचे अभ्यासक आणि आध्यात्मिक ग्रंथांचे लेखक विद्यावाचस्पती प्रा. डॉ. रामकृष्णादादा महाराज पाटील लिखित पाच पुस्तकांचा प्रकाशन समारंभ सीनियर सिटीझन संडे मॉर्निंग ग्रुप मध्ये थाटात संपन्न झाला. संत साहित्याचे अभ्यासक आणि सुमारे दीडशे होऊन अधिक आध्यात्मिक ग्रंथांचे लेखन केलेले प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून साकार झालेल्या आणि नव्याने विविध प्रकाशन संस्थांकडून प्रकाशित झालेल्या ' चेतना के शाश्वत स्वर '(हिंदी), ' श्री गुरु स्तवन मंजिरी,' ' विचार मंथन ',' मूल्यवेध ', 'भक्तीच्या वाटेवरी पंढरीची वारी ' या पाच पुस्तकांचा भव् स्वरूपात प्रकाशन समारंभ थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सुभाष सुतार, मेजर नागनाथ मोरे, बँकिंग ऑफिसर विकास कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण जोशी, सुभाष सोनार, वासुदेव महाजन, माधवराव उंबरकर, चंद्रकांत आंबोळे, संजय कुलकर्णी, शरद फलक, विनायक अत्तरदे, शिवाजीराव पाटील उपस्थित होते. उपस्थितांनी पुस्तक प्रकाशनवेळी शुभेच्छा दिल्या.
9 ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिवस आणि कामिका एकादशीच्या मुहूर्तावर प्रकाशन समारंभ झाल्याबद्दल उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांनी केले. वाचकांना लवकरच वैचारिक ग्रंथ, प्रबोधन करणारे कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबऱ्या यांची मेजवानी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिनियर सिटीझन संडे मॉर्निंग वॉक ग्रुपमध्ये प्रा.डॉ.रामकृष्णा पाटील यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन.
जामनेर - प्रतिनिधी
येथील संत साहित्याचे अभ्यासक आणि आध्यात्मिक ग्रंथांचे लेखक विद्यावाचस्पती प्रा. डॉ. रामकृष्णादादा महाराज पाटील लिखित पाच पुस्तकांचा प्रकाशन समारंभ सीनियर सिटीझन संडे मॉर्निंग ग्रुप मध्ये थाटात संपन्न झाला. संत साहित्याचे अभ्यासक आणि सुमारे दीडशे होऊन अधिक आध्यात्मिक ग्रंथांचे लेखन केलेले प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून साकार झालेल्या आणि नव्याने विविध प्रकाशन संस्थांकडून प्रकाशित झालेल्या ' चेतना के शाश्वत स्वर '(हिंदी), ' श्री गुरु स्तवन मंजिरी,' ' विचार मंथन ',' मूल्यवेध ', 'भक्तीच्या वाटेवरी पंढरीची वारी ' या पाच पुस्तकांचा भव् स्वरूपात प्रकाशन समारंभ थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सुभाष सुतार, मेजर नागनाथ मोरे, बँकिंग ऑफिसर विकास कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण जोशी, सुभाष सोनार, वासुदेव महाजन, माधवराव उंबरकर, चंद्रकांत आंबोळे, संजय कुलकर्णी, शरद फलक, विनायक अत्तरदे, शिवाजीराव पाटील उपस्थित होते. उपस्थितांनी पुस्तक प्रकाशनवेळी शुभेच्छा दिल्या.
9 ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिवस आणि कामिका एकादशीच्या मुहूर्तावर प्रकाशन समारंभ झाल्याबद्दल उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांनी केले. वाचकांना लवकरच वैचारिक ग्रंथ, प्रबोधन करणारे कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबऱ्या यांची मेजवानी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.