- Hindi News
- मुंबई
- १५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..
१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..
मुंबई -
राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना, १५ ऑगस्टपासून जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. अमराठी चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानातून, एक लाखांहून अधिक चालकांनी आतापर्यंत, प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना १७ ऑगस्टला प्रमाणपत्रांचं वितरण केलं जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. इथं रोजीरोटी कमावणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा सन्मान करावा, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सरनाइक यावेळी म्हणाले.
उर्वरित अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं...
१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..
मुंबई -
राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना, १५ ऑगस्टपासून जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. अमराठी चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानातून, एक लाखांहून अधिक चालकांनी आतापर्यंत, प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना १७ ऑगस्टला प्रमाणपत्रांचं वितरण केलं जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. इथं रोजीरोटी कमावणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा सन्मान करावा, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सरनाइक यावेळी म्हणाले.
उर्वरित अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं...