- Hindi News
- राज्य
- बळवंत महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ..
बळवंत महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ..
सांगली प्रतिनिधी -
बळवंत महाविद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण आणि विकसित भारत २०४७ युवा शक्ती यावर विशेष भर देण्यात आला असून यानिमित्ताने हर घर तिरंगा अभियान, ९ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ध्वजारोहन आणि वंदे मातरम गीत गायन, एन . एस. एस. व एन.सी. सी. विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबवून मोठ्या दिमाखात हा सोहळा साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. चंद्रकांत बोबडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. आपल्या अभिभाषणात प्राचार्य बोबडे यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या, आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या सर्व महापुरुषांच्या कार्याची माहिती दिली. उपस्थितांना व्यसनमुक्तीची, आपला शालेय परिसर स्वच्छ व अंमली पदार्थ मुक्त ठेवण्याची शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामचंद्र मुजमुले यांनी केले. कार्यक्रमास वरिष्ठ विभागाचे उपप्रचार्य डॉ.राजकुमार मरे, डॉ. अरविंद तपासे, डॉ. राणी किर्दत, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. अजित साळुंखे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. राहुल पाटील, लेफ्टनंट डॉ. शंकर शेंडगे,कार्यालयीन प्रमुख विलास मासाळ, प्रा.आशिष देशमुख, प्रा. दीपक पवार तसेच महाविद्यालयातील सर्व सेवक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
बळवंत महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ..
सांगली प्रतिनिधी -
बळवंत महाविद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण आणि विकसित भारत २०४७ युवा शक्ती यावर विशेष भर देण्यात आला असून यानिमित्ताने हर घर तिरंगा अभियान, ९ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ध्वजारोहन आणि वंदे मातरम गीत गायन, एन . एस. एस. व एन.सी. सी. विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबवून मोठ्या दिमाखात हा सोहळा साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. चंद्रकांत बोबडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. आपल्या अभिभाषणात प्राचार्य बोबडे यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या, आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या सर्व महापुरुषांच्या कार्याची माहिती दिली. उपस्थितांना व्यसनमुक्तीची, आपला शालेय परिसर स्वच्छ व अंमली पदार्थ मुक्त ठेवण्याची शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामचंद्र मुजमुले यांनी केले. कार्यक्रमास वरिष्ठ विभागाचे उपप्रचार्य डॉ.राजकुमार मरे, डॉ. अरविंद तपासे, डॉ. राणी किर्दत, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. अजित साळुंखे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. राहुल पाटील, लेफ्टनंट डॉ. शंकर शेंडगे,कार्यालयीन प्रमुख विलास मासाळ, प्रा.आशिष देशमुख, प्रा. दीपक पवार तसेच महाविद्यालयातील सर्व सेवक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.