- Hindi News
- राज्य
- भटाणे येथे ‘जय जवान, जय किसान’चा जयघोष; माजी सैनिकांचा सत्कारसह २०० वृक्षांचे वाटप..
भटाणे येथे ‘जय जवान, जय किसान’चा जयघोष; माजी सैनिकांचा सत्कारसह २०० वृक्षांचे वाटप..
त-हाडी प्रतिनिधी -
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झुआरी कंपनीच्या वतीने भटाणे गावात ‘जय जवान, जय किसान’ अभियानांतर्गत माजी सैनिकांचा सत्कार तसेच वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशसेवेत योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात भटाणे गावाचे सरपंच श्री. संजय पाटील, पोलीस पाटील श्री. धनराज पाटील, माजी सैनिक कृष्णा छगन कोळी (आर्मी हवालदार), माजी सैनिक श्री. सतीश नाटू देवरे (बीएसएफ कॉन्स्टेबल), कृषी सहाय्यक सौ. ललिता पवार, श्री कृषी विकास केंद्र, शिरपूरचे संचालक श्री. राजेंद्र भंडारी तसेच पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे मार्केटिंग मॅनेजर श्री. किरण राठोड यांच्या उपस्थितीत झाली.
पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे मार्केटिंग मॅनेजर श्री. किरण राठोड यांनी सीमेवर देशाचे रक्षण करणारे जवान आणि देशाचे पोषण करणारे शेतकरी यांचे महत्त्व अधोरेखित करत ‘जय जवान, जय किसान’चा जयघोष केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून जवान, शेतकरी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले.
श्री कृषी विकास केंद्र, शिरपूरचे संचालक श्री. राजेंद्र भंडारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शेती सजीव आणि सुपीक ठेवायची असेल तर जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. रासायनिक खते आणि सेंद्रिय खतांचा योग्य समतोल राखणे गरजेचे असून, जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय घटकांचा वापर वाढवावा, असे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनाबाबत बोलताना भंडारी यांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात किमान दहा झाडे लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. तसेच महिलांनीही विविध सामाजिक, कृषी आणि विकासाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ‘चूल आणि मूल’ या पारंपरिक चौकटीबाहेर येत प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे माजी सैनिक आणि गावातील शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आलेले वृक्षारोपण. यावेळी २०० वृक्षांचे वाटप गावातील शेतकऱ्यांना करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याला एक वृक्ष देऊन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत परिसरातही मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील मोठ्या संख्येने शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशसेवकांचा सन्मान, शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या त्रिसूत्री उपक्रमामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे जय किसान कृषी सल्लागार श्री. जगदीश लोहार यांनी केले. उपस्थित मान्यवर, शेतकरी, महिला व ग्रामस्थांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.
भटाणे येथे ‘जय जवान, जय किसान’चा जयघोष; माजी सैनिकांचा सत्कारसह २०० वृक्षांचे वाटप..
त-हाडी प्रतिनिधी -
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झुआरी कंपनीच्या वतीने भटाणे गावात ‘जय जवान, जय किसान’ अभियानांतर्गत माजी सैनिकांचा सत्कार तसेच वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशसेवेत योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात भटाणे गावाचे सरपंच श्री. संजय पाटील, पोलीस पाटील श्री. धनराज पाटील, माजी सैनिक कृष्णा छगन कोळी (आर्मी हवालदार), माजी सैनिक श्री. सतीश नाटू देवरे (बीएसएफ कॉन्स्टेबल), कृषी सहाय्यक सौ. ललिता पवार, श्री कृषी विकास केंद्र, शिरपूरचे संचालक श्री. राजेंद्र भंडारी तसेच पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे मार्केटिंग मॅनेजर श्री. किरण राठोड यांच्या उपस्थितीत झाली.
पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे मार्केटिंग मॅनेजर श्री. किरण राठोड यांनी सीमेवर देशाचे रक्षण करणारे जवान आणि देशाचे पोषण करणारे शेतकरी यांचे महत्त्व अधोरेखित करत ‘जय जवान, जय किसान’चा जयघोष केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून जवान, शेतकरी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले.
श्री कृषी विकास केंद्र, शिरपूरचे संचालक श्री. राजेंद्र भंडारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शेती सजीव आणि सुपीक ठेवायची असेल तर जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. रासायनिक खते आणि सेंद्रिय खतांचा योग्य समतोल राखणे गरजेचे असून, जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय घटकांचा वापर वाढवावा, असे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनाबाबत बोलताना भंडारी यांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात किमान दहा झाडे लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. तसेच महिलांनीही विविध सामाजिक, कृषी आणि विकासाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ‘चूल आणि मूल’ या पारंपरिक चौकटीबाहेर येत प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे माजी सैनिक आणि गावातील शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आलेले वृक्षारोपण. यावेळी २०० वृक्षांचे वाटप गावातील शेतकऱ्यांना करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याला एक वृक्ष देऊन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत परिसरातही मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील मोठ्या संख्येने शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशसेवकांचा सन्मान, शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या त्रिसूत्री उपक्रमामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे जय किसान कृषी सल्लागार श्री. जगदीश लोहार यांनी केले. उपस्थित मान्यवर, शेतकरी, महिला व ग्रामस्थांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.